Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सर्व माहिती वाचा आणि शेअर करा.

आवश्यकता भासल्यास 1 मार्च पासून पुन्हा शाळा बंद कराव्यात- शिक्षणमंत्री यांचे महत्त्वाचे निर्देश

आवश्यकता भासल्यास 1 मार्च पासून पुन्हा शाळा बंद कराव्यात-  शिक्षणमंत्री यांचे महत्त्वाचे निर्देश


मुंबई - (दि.२५ फेब्रु) : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे त्या अनुषंगाने राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार दि.१ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटरवर ट्विट करत सांगितले आहे. तसेच विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देत. ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे; तिथे आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.

https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1364892817365946368?s=19

कोरोनाचा जिल्हानिहाय आढावा :

राज्यात काही जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मी, मा. समाजकल्याण मंत्री व मा. आदिवासी मंत्री, कल्याण विभाग यांच्याशी चर्चा करत आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत आहे. अश्या प्रकारचे माहिती शिक्षणमंत्री यांनी फेसबुकवर पोस्ट करत दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या